राष्ट्ररक्षक मराठे

 1️⃣रोहिले कोणाला म्हणत ?

अफगाणिस्तानातून आलेल्या पठाणांना रोहिले म्हणत.

2️⃣ अहमदशाह अब्दालीने मराठयांना चौथाईचा हक्क का दिला ?

मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले. म्हणून अब्दालीने मराठ्यांना मुघलांच्या सुभ्यामधील चौथाईचा हक्क दिला.

3️⃣ मराठ्यांनी अब्दालीबरोबर झालेल्या करारात काय मान्य केले ?

मराठ्यांनी रोहिले, जाट , राजपूत , अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले.

4️⃣ मुघलांच्या सुभ्यामध्ये कोणाचा समावेश होता ?

मुघलांच्या सुभ्यामध्ये काबूल , कंदाहार आणि पेशावर यांचा समावेश होता.

5️⃣ दत्ताजी व अब्दाली यांची लढाई कोठे झाली ?

दत्ताजी व अब्दाली यांची लढाई यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झाली.

6️⃣ सदाशिवरावभाऊ कोण होता ?

सदाशिवरावभाऊ हा चिमाजीआप्पा यांचा मुलगा होता.

7️⃣ सदाशिवरावभाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता ?

इब्राहिमखान गारदी हा सदाशिवरावभाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.

8️⃣ पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली ?

१४ जानेवारी १७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली.

9️⃣ पेशवा माधवराव याने निजामाला कोठे पराभूत केले ?

पेशवा माधवराव याने निजामाला पैठणजवळील राक्षसभुवन येथे पराभूत केले.

🔟 मराठ्यांच्या इतिहासात माधवराव पेशव्यांचा उल्लेख कसा केला जातो ?

मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक , कष्टाळू , जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून माधवराव पेशव्यांचा उल्लेख केला जातो.

Comments

Popular posts from this blog

News Analysis Questions & Answers

🟣 सूर्यनमस्कार मंत्र व आसने